होय, मी शेतकरी........!!!!
आपण बघत असलेल्या विडिओ मध्ये वास्तव्य हे आपल्या महाराष्ट्रा मध्ये नव्हे संपूर्ण देश भरातील शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे.
कारण एकच शेतकऱ्याने आपल्या पोटाच्या मुलाप्रमाणे आपल्या पिकाची काळजी घेऊन, सावकारा कडून, बँकेकडून कर्ज काढून पीक घेतलेले असते.... परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणा आणि प्रत्येक पिका ला हमी भाव नसल्यामुळे मुळे आज आपल्या बळी राज्याला अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे..व आपल्या सोन्यासारख्या पिकाला कवडीमोल भावाने व्यापारी ला इच्छा नसताना भाड्याने लावलेल्या गाडीचे किंवा ट्रॅक्टर चे पैसे ही दिले जाणार नाही हे माहित असताना आपले पीक विक्री करावी लागते...
परंतू शेतकऱ्यांनी हिम्मत न हरता पुन्हा त्याच जोमाने उभे राहून
पारंपरिक पीक न घेता नवनवीन पिकाची किंवा फळबाग (ड्रॅगन फूड, कोरपड, जिरेनियम, तुती,शेवाळ शेती, किंवा कमी खर्चात उत्पन्न काढता येईल असे पीक घ्यावे..या प्रमाणे शेती करावी त्यामध्ये जोड व्यवसाय ची मदत घ्यावी मस्तपालन, शेळी पालन, कुकूट पालन, तसेच ....रासायनिक खताना जास्त खर्च न करता शेणखताचा वापर जास्तीत जास्त करावा....
आणि सर्वात महत्वाचे लक्षात असू द्यावे की जगाला शेतकऱ्यां शिवाय जगाला पर्याय नाही....आणि ते आपण सर्वांनी कोरोना काळात अनुभवले.
आपण आहे तर सर्व जग आहे.... हे लक्षात ठेऊन पुन्हा जोमाने उभे राहावे.... अजिबात वाईट विचार करू नये....
✒️✒️✒️विकास...🌱